Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Yusuf Pathan Latest News : युसूफ पठाणसह तीन खासदारांनी मोदींच्या एनडीएची साथ सोडली; काय आहे कारण?

Yusuf Pathan Latest News : युसूफ पठाणसह तीन खासदारांनी मोदींच्या एनडीएची साथ सोडली; काय आहे कारण?

NDA Meeting News : तृणमूल काँग्रेसमधून फुटून निघालेल्या २० एनसीपीआय खासदारांपैकी तीन खासदारांनी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत

दिल्ली : एनडीए म्हणजेच भारतीय जनता पक्ष प्रणित 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी' मधील घटक पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी सत्ताधारी पक्षांच्या खासदारांच्या साप्ताहिक बैठकीत भाग घेतला.

तथापि, तृणमूल काँग्रेसमधून फुटून निघालेल्या २० एनसीपीआय खासदारांपैकी तीन खासदारांनी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, यावरून सत्ताधारी पक्षांच्या समन्ववायत त्यांच्या संबंधांबाबत मतभेद असल्याचे बोलले जात आहे. गैरहजर राहिलेल्या या खासदारांमध्ये बहारामपूरचे खासदार युसूफ पठाण यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील जांगीपूरचे खलीलुर रहमान, मुर्शिदाबादचे अबू ताहेर खान आणि बहारामपूरचे युसूफ पठाण यांनी यापूर्वी २१ जुलै रोजी झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या पहिल्या 'मंगल मिलन' बैठकीला हजेरी लावली नव्हती.

काय कारण देण्यात आले?

खान यांनी संसद परिसरात पत्रकारांना सांगितले, "आम्ही एनडीए सोबत नाही, आणि भाजपमध्येही सामील होत नाही. आज एनडीएची बैठक होती, पण आम्ही तिघे त्यात सहभागी झालो नाही." "तथापि, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीला मी उपस्थित राहीन, कारण ती माझ्या संसदीय मतदारसंघातील विकासकामांशी संबंधित आहे. आम्ही मुस्लिमांविरुद्धच्या कोणत्याही कारवाईला पाठिंबा देणार नाही." दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हेही मंगळवारी संसद भवनात दाखल झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्लिमबहुल मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तीन खासदारांनी, त्यांच्या मतदारांच्या एका गटाने भाजपशी असलेल्या कथित जवळीकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे एनडीएच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला.

एनसीपीआयला अद्याप मान्यता नाही -

या तीन खासदारांची अनुपस्थिती यासाठीही महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण लोकसभेतील २० सदस्यीय एनसीपीआय गटाला मान्यता देण्याचा मुद्दा अद्याप लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे प्रलंबित आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, या फुटीर गटाला संरक्षण तेव्हाच मिळू शकते, जेव्हा त्यांना तृणमूल काँग्रेसच्या मूळ २८ लोकसभा खासदारांपैकी किमान दोन-तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असेल. युसूफ पठाण आणि सयोनी घोष यांच्यासह वीस खासदारांनी एनसीपीआय विलीन होण्याचा निर्णय घेतला होता.

एनसीपीआयचे सभागृह नेते सुदीप बंडोपाध्याय हेही मंगळवारी पहिल्यांदाच एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले. बंडोपाध्याय म्हणाले, "मी देशातील सर्वात ज्येष्ठ खासदारांपैकी एक आहे. एनसीपीआयमधील सर्वजण एकजूट आहेत. हा एक चांगला अनुभव आहे." त्यांनी बंडखोर खासदारांमधील मतभेदांच्या अटकळीही फेटाळून लावल्या.


Related

दिल्ली : एनडीए म्हणजेच भारतीय जनता पक्ष प्रणित 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी' मधील घटक पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी सत्ताधारी पक्षांच्या खासदारांच्या साप्ताहिक बैठकीत भाग घेतला. तथापि, तृणमूल काँग्रेसमधून फुटून निघालेल्या २० एनसीपीआय खासदारांपैकी तीन खासदारांनी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, यावरून सत्ताधारी पक्षांच्या समन्ववायत त्यांच्या संबंधांबाबत मतभेद असल्याचे बोलले जात आहे. गैरहजर राहिलेल्या या खासदारांमध्ये बहारामपूरचे खासदार युसूफ पठाण यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील जांगीपूरचे खलीलुर रहमान, मुर्शिदाबादचे अबू ताहेर खान आणि बहारामपूरचे युसूफ पठाण यांनी यापूर्वी २१ जुलै रोजी झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या पहिल्या 'मंगल मिलन' बैठकीला हजेरी लावली नव्हती.

काय कारण देण्यात आले?

एनसीपीआयला अद्याप मान्यता नाही -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra