Dailyhunt
युद्धजन्य परिस्थितीत भारत ठाम; उद्योगांवर मर्यादित परिणाम - योगेश कदम

युद्धजन्य परिस्थितीत भारत ठाम; उद्योगांवर मर्यादित परिणाम - योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) - जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसत असताना भारत मात्र तुलनेने स्थिर राहिल्याचे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री Yogesh Kadam यांनी व्यक्त केले आहे.

खेड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कदम म्हणाले की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये उद्योगधंदे आणि पर्यटन क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले आहे. मात्र भारतात उद्योगांवर केवळ मर्यादित परिणाम झाला असून देशाची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणात अबाधित राहिली आहे. यामागे केंद्र सरकारचे योग्य नियोजन आणि दूरदृष्टी महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णायक धोरणांमुळेच भारताने या आव्हानात्मक परिस्थितीत स्थैर्य राखले असल्याचे कदम यांनी सांगितले.
विशेषतः गॅस आयातीच्या क्षेत्रात भारताने मिळवलेले यश उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. इतर अनेक देशांना ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्या तुलनेत भारताने पर्यायी स्रोत आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या जोरावर ऊर्जा गरजा पूर्ण केल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, कठीण जागतिक परिस्थितीत भारत सक्षमपणे उभा राहत असून देशाला सावरण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital