Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CBSE च्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी करूनही काहीही हाती लागणार नाही, अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

CBSE च्या उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी करूनही काहीही हाती लागणार नाही, अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

सामना 3 weeks ago

सीबीएसईच्या निकाल आणि उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसमोर उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी करूनही काहीही हाती लागणार नाही, कारण संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे केवळ देशाच्या वर्तमानालाच नव्हे तर भविष्यालाही धोका निर्माण करत असल्याचे ते म्हणाले.

अखिलेश यादव यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले की, सीबीएसई प्रकरणात सर्वात मोठी समस्या म्हणजे ज्या यंत्रणेवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत, तीच यंत्रणा फेरतपासणीही करणार आहे. "घोटाळा करणारी भाजपची भ्रष्ट व्यवस्था तीच असल्याने उत्तरपत्रिका पुन्हा तपासूनही काय साध्य होणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणात कुणीही जबाबदारी स्वीकारत नाही, तसेच कुणीही राजीनामा देण्यास तयार नसल्याची टीकाही त्यांनी केली.

शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व निर्णय आणि अधिकार सत्तेच्या वाटपावेळी भाजपच्या सहकाऱ्यांनी स्वतःकडे घेतले होते, असा आरोप करत अखिलेश यादव म्हणाले की, आता घोटाळा उघडकीस आल्यानंतर तेच लोक भूमिगत झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे लोक देशाच्या भविष्यासोबत विश्वासघात करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

नैतिकतेच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे राजकारण करणारे लोक आता कुठे आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "आजचा युवा म्हणतोय - नो मोअर भाजप!" असा राजकीय संदेश देत त्यांनी भाजपविरोधात युवकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीचा उल्लेख केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana