Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
केरळम आणि कर्नाटकला मुसळधार पावसाचा फटका, जनजीवन विस्कळीत

केरळम आणि कर्नाटकला मुसळधार पावसाचा फटका, जनजीवन विस्कळीत

सामना 3 weeks ago

देशभरातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर आला असून, त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जण बेपत्ता आहेत.

सरकारने 209 मदत शिबिरे उभारली असून, 5 हजार 792 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. रविवारी सकाळी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात भूस्खलनात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मल्लिकार्जुन (35), पत्नी नागवेणी (28) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी ते डोंगराजवळील एका घरात झोपले होते.

शनिवारी झालेल्या ढगफुटीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील छतरू भागात अचानक पूर आला. अनेक घरे आणि दुकानांचे नुकसान झाले, दोन गाड्या वाहून गेल्या आणि रस्त्यांवर ढिगाऱ्यांचा खच पडला. खबरदारीचा उपाय म्हणून, किश्तवार, डोडा आणि रामबन येथील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्तरकाशीमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाले. चमोलीतील गौचरजवळ कामेडा येथे बद्रीनाथ महामार्गाचा 20 मीटरचा भाग खचल्याने वाहतूक एकेरी करावी लागली. हवामान विभागाने 7 ऑगस्टपर्यंत खराब हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Saamana