हिंदुस्थानात उष्णतेची लाट थैमान घालत असल्याने दिवसेंदिवस तापमानही वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत केवळ माणसेच नाही, तर वनस्पती आणि झाडेही या उन्हात होरपळली जात आहेत.
उष्ण वारे, सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे झाडे मरत आहेत. उन्हाळ्यात झाडांना जास्त पाणी, योग्य जागा आणि विशेष काळजीची आवश्यकता असते. तीव्र सूर्यप्रकाशाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे झाडांची पाने जळू शकतात आणि त्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. चला, उष्णतेच्या लाटेदरम्यान आपल्या झाडांची काळजी घेण्याच्या काही टीप्स जाणुन घ्या.
- उष्णतेच्या लाटेत झाडे सुकणे आणि कोमेजणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
परंतु त्यांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही पद्धती वापरून पाहू शकता, त्यापैकी एक म्हणजे थंड पाण्याचा वापर. याचा अर्थ झाडांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणे. उष्णतेच्या लाटेत दुपारी पाणी दिल्याने माती लवकर गरम होऊ शकते, म्हणून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी देण्याचा प्रयत्न करा. सकाळी थंड पाणी दिल्याने झाडाच्या मुळांना आराम मिळतो आणि दिवसभर ओलावा टिकून राहण्यास मदत होते. - तीव्र सूर्यप्रकाश आणि कडक उन्हामुळे रोपांच्या सभोवतालची माती लवकर सुकते.
वारंवार पाणी देणे अशक्य होते. अशा परिस्थितीत, कुंडीतील मातीवर वाळलेले गवत, नारळाचा काथ किंवा वाळलेली पाने पसरा. यामुळे मातीला लवकर सुकण्यापासून रोखतो आणि रोपे बराच काळ ताजी ठेवतो. - वनस्पतींना तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे वनस्पतींची पाने जळू शकतात आणि सुकू शकतात. तीव्र सूर्यप्रकाशापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी जुना सुती स्कार्फ, तागाची गोणी किंवा हिरवी जाळी वापरून रोपांवर ठेवा यामुळे रोपांना सावली मिळते.
त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून दिलासा मिळेल आणि त्या कोमेजण्यापासून वाचतील. - उष्णतेच्या लाटेत झाडांची पाने लवकर सुकतात. अशा परिस्थितीत, दिवसातून एकदा स्प्रे बॉटलने पानांवर हलका फवारा मारा. यामुळे पाने थंड होतात आणि झाडांना ताजेपणा येतो. मात्र, जास्त पाणी फवारू नये याची काळजी घ्या, कारण त्यामुळे बुरशीची वाढ होऊ शकते.

