Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
२५ जूनपासून राज्यभरात 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान' !

२५ जूनपासून राज्यभरात 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान' !

मुंबई - येत्या २५ जूनपासून राज्यभर 'नशामुक्त महाराष्ट्र अभियान' राबवण्यात येणार असून त्यात सर्व लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटना यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री अधिवक्ता आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत सुमारे १६० मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते, तसेच महापौर सौ. रितू तावडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. किनारी भागांतील तिवरांच्या अनधिकृत तोडी, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi