नागपूर - मी मुख्यमंत्री झालो, ही लोकशाहीची कमाल आणि राज्यघटनेची शक्ती आहे. भविष्यात कुणालाही जर राज्याचे मुख्यमंत्री व्हावेसे वाटले, तर त्यासाठीही हीच राज्यघटना आणि भक्कम लोकशाही व्यवस्था यांचे सामर्थ्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
'मंथन-४'च्या मंचावरून तरुणांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि बुद्धीबळपटू दिव्या देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

