मुंबई - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी शेतकरी, कामगार, दिव्यांग यांच्यासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे, म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
त्यांची प्रहार संघटना आहे तशीच रहाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

