मुंबई - शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय मंत्रीमंडळाच्या पटलावर आहे; परंतु येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अट घातली आहे. 'कर्जमाफीसाठी प्रशासकीय कार्यवाही चालू ठेवता येईल; मात्र अधिकृत घोषणा करता येणार नाही', असे आयोगाने सांगितले आहे.
त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

