Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फलटणमध्ये जेवणाच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित; अंधार आणि उकाड्याने नागरिक त्रस्त

फलटणमध्ये जेवणाच्या वेळेतच वीजपुरवठा खंडित; अंधार आणि उकाड्याने नागरिक त्रस्त

लटणमधील नाना पाटील चौक परिसरात रात्री जेवणाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत आहे. अंधार व उकाड्यामुळे नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि.

०३ जुलै : फलटण शहरातील मध्यवर्ती नाना पाटील चौक आणि बारामती रोड परिसरात गेल्या आठवड्यापासून दररोज रात्री वीजपुरवठा खंडित होत आहे. नेमक्या जेवणाच्या वेळेत वीज जात असल्याने नागरिकांना अंधारात जेवण करावे लागत असून उकाडा व डासांच्या प्रादुर्भावाने लहान मुले आणि महिलांचे मोठे हाल होत आहेत.

नाना पाटील चौक, रविवार पेठ, मंगळवार पेठ, बारामती रोडवरील सोसायट्या आणि बस स्थानक परिसरातील व्यापारी गाळे या भागात रात्री ८ ते १० या वेळेत अचानक वीज जाते. ताटात जेवण वाढून ठेवल्यावर अंधार होत असल्याने नागरिकांना मोबाईलच्या उजेडात जेवण करावे लागते. उकाड्यामुळे खिडक्या उघडल्यास डासांचा त्रास वाढतो. दिवसभर काम करून आलेल्या नागरिकांना रात्री सुखाने जेवणही करता येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सततच्या वीजकपातीमुळे परिसरातील हॉटेल, मेडिकल आणि किराणा दुकानांचे मोठे नुकसान होत आहे. अंधारामुळे ग्राहक माघारी परतत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याशिवाय, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत असून मेणबत्तीच्या उजेडात डोळ्यांवर ताण येत आहे. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने फलटणकरांची रोजची कसरत सुरूच आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sthairya