Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ratnagiri News: पावसाळी मासेमारीवर १ जूनपासून बंदी

Ratnagiri News: पावसाळी मासेमारीवर १ जूनपासून बंदी

नियम मोडणाऱ्या नौकांवर होणार थेट कारवाई

सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, माशांच्या प्रजननाचा काळ आणि पावसाळ्यात मच्छीमारांच्या जीविताची सुरक्षा लक्षात घेऊन राज्य शासनाने यंदाची पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिक आणि यंत्रचलित नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी असणार आहे.

नियम मोडणाऱ्या नौकांवर होणार थेट कारवाई

मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना कडक इशारा दिला आहे. बंदीच्या या दोन महिन्यांच्या काळात जे कोणी नियमांचे उल्लंघन करून समुद्रात मासेमारीसाठी जातील, त्यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१’ अंतर्गत अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व मच्छीमार, नौकामालक, तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बंदी कशासाठी? दोन महत्त्वाची कारणे

१. मत्स्य संवर्धन: पावसाळ्याचा हा काळ विविध माशांच्या प्रजातींचा प्रजननाचा (Breeding Season) असतो. या काळात मासेमारी थांबवल्यास भविष्यात मासळी उत्पादनात मोठी वाढ होते, ज्याचा फायदा पुढे मच्छीमारांनाच होतो.

२. सुरक्षा: पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा वातावरणात समुद्रात जाणे अत्यंत धोकादायक असल्याने अपघातांचा मोठा धोका असतो.

मच्छीमारांना सहकार्य करण्याचे आवाहन

या मासेमारी बंदीमुळे नैसर्गिकरित्या मत्स्यसाठा वाढण्यास मदत होईल आणि पर्यायाने मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ होईल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई शहराचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त यांनी सर्व संबंधित घटकांनी या नियमांचे पालन करून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat