वेंगुर्ले -
तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी - कोंडासकरवाडी येथील काजू आणि आंब्याच्या कलमांना आग लागून मोठे नुकसान झाले. सुमारे 1000 कलमे आगीत होरपळून गेली. गावातील एम . के गावडे, रमेश शेर्लेकर, महेश शेर्लेकर, सुरेश गावडे, नारायण शेर्लेकर, भाऊ नाईक आदी शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले असून पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

