Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुर्दैवी घटना! वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

दुर्दैवी घटना! वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू

रांची

Jharkhand rain alert झारखंड राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये एका मुलीसह दोन महिलांसह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी गढवा जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर रांची, धनबाद आणि बोकारो येथे प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या घटनांची पुष्टी केली आहे.राजधानी रांचीतील इटकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुल्ली गावात 12 वर्षीय आश्रिता ही मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत आंबे तोडत असताना वीज कोसळून तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिचे पालकही जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.गढवा जिल्ह्यातील कंडी पोलीस ठाण्यांतर्गत गराखुर्द गावात 45 वर्षीय महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर बनजंघा गावात 32 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी Jharkhand rain alert सांगितले. त्याचप्रमाणे धनबादच्या राजगंज परिसरातील चुंगी गावात 44 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर बोकारो जिल्ह्यातील पिंडराजोरा परिसरातील बाबूडीह गावात 21 वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला.

दरम्यान, सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत हवामानात मोठा बदल दिसून आला आहे. शुक्रवारी झारखंडच्या बहुतांश भागांत मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वातावरण निर्माण झाले होते, जे शनिवारी सकाळपर्यंत सुरूच राहिले. या बदलामुळे राज्यातील कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहेभारतीय हवामान विभागाने (IMD) रांची, रामगढ, बोकारो, कोडरमा, गिरिडीह, धनबाद आणि गोड्डा यांसह 13 जिल्ह्यांसाठी रविवार सकाळपर्यंत वादळी पावसाचा अंदाज वर्तवत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

रांची हवामान केंद्राचे उपसंचालक अभिषेक आनंद यांनी सांगितले की, दोन कमी दाबाच्या प्रणालींमुळे हवामानात हा बदल झाला आहे. त्यांच्या मते, झारखंडमध्ये कमाल तापमानात तब्बल 7 अंश सेल्सिअसपर्यंत घट नोंदवली गेली असून पुढील चार दिवसांत तापमानात पुन्हा 3 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.शुक्रवारी डाल्टनगंजमध्ये कमाल तापमान 34.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 6.2 अंशांनी कमी होते. तर चाईबासा येथे 33.4 अंश आणि रांची येथे 27.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.या घटनांमुळे राज्यात नैसर्गिक आपत्तीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने नागरिकांना वादळी हवामानादरम्यान सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur