तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर,
तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागला आहे. तालुक्यातील सिरोली येथील अनेक शेतकरी जपानी पद्धतीने भातशेतीची लागवड करून अधिक उत्पन्न घेत आहेत.
जपानी पद्धतीने लागवड करणार्या शेतकर्यांमध्ये नीताराम मस्के, प्रदीप मस्के, अनिल मस्के, रमेश मस्केचा समावेश आहे. या शेतकर्यांच्या मार्गदर्शनात परिसरातील शेतकरी आता जपानी पद्धतीने भातपीक लागवड करू लागले आहेत. जपानी पद्धतीने भात शेती केल्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. शेतकर्यांना कीटकनाशके फवारणी व खते देणे या पद्धतीने सोपे जाते. फुटव्यांची संख्या जास्त आल्याने पारंपारिक भातपीक लागवडी पेक्षा उत्पादनात वाढ होऊन शेतकर्यांना अधिक नफा मिळतो. तालुक्यातील शेतकर्यांनी जपानी भातपीक पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन कृषी सहाय्यक यशवंत कुंभरे यांनी केले आहे.

