Dailyhunt
Navi Mumbai: ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास होणार सुसाट!

Navi Mumbai: ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास होणार सुसाट!

Flyover

मुंबई (Mumbai): नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या ठाणे-बेलापूर मार्गाचे रूपडे आता पालटणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने या मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नूतनीकरणासाठी तब्बल ८४६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

Tender Scam: नाशिक जिल्हा परिषदेने गाठला अनियमिततेचा कळस; मर्जीतील ठेकेदारांसाठी वाट्टेल ते!

केंद्र सरकारच्या विशेष संयुक्त गुंतवणूक योजनेअंतर्गत (हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल) राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामध्ये रस्ते विकासासह तीन नवीन उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये रबाळे चौक, क्रिस्टल हाऊस ते पावणे आणि महापे येथील औद्योगिक क्षेत्रातील कंपनीपासून ह्युंदाई शोरूमपर्यंतच्या पट्ट्यात हे उड्डाणपूल उभारले जातील.

याशिवाय, मुख्य रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी देखील मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तुर्भे येथे यापूर्वीच एका पुलाचे काम सुरू असून, आता या नवीन कामांमुळे संपूर्ण मार्गावरील प्रवास विनाअडथळा होणार आहे.

केवळ रस्तेच नव्हे, तर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करून या कामात सुधारित सांडपाणी आणि पर्जन्य जलवाहिन्यांची यंत्रणा बसवण्यात येणार आहे. खराब झालेले सिमेंटचे ब्लॉक बदलणे आणि रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून सुशोभीकरण करणे, असा हा सर्वसमावेशक आराखडा आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून रस्ते खराब होण्याचे प्रमाण कमी होईल आणि संरचनात्मक दर्जा उंचावेल.

Mumbai: मुंबईकरांच्या संघर्षाला मिळणार हक्काच्या घराची 'छत्रछाया'

ठाणे-बेलापूर पट्ट्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) हद्दीत औद्योगिक आणि निवासी संकुले वाढल्याने वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या ताणाचा विचार करता, विकासकामांच्या खर्चाचा भार एमआयडीसीने देखील उचलणे अपेक्षित असल्याचे मत महानगरपालिकेने व्यक्त केले आहे. यासाठी पालिकेने महामंडळाकडे ४०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

हा प्रकल्प भविष्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या दळणवळण जाळ्याचा एक मुख्य भाग आहे. ठाणे, मीरा-भाईंदर आणि ऐरोली ते पनवेल-उरण या उत्तर-दक्षिण भागाला जोडण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

Nashik: मंत्री कोकाटेंनी शोधली सिंहस्थ आराखड्यातील त्रुटी! काय सूचविले 2 नवे पर्याय?

कटई बोगदा, शीव-पनवेल महामार्ग आणि 'अटल सेतू' (शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्ग) यांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

कसा आहे मास्टरप्लान?

रबाळे जंक्शन (171 कोटी), क्रिस्टल हाऊस ते पावणे (110 कोटी) आणि महापे येथील बीएएसएफ कंपनीपासून ह्युंदाई शोरूमपर्यंत (338 कोटी) फ्लायओव्हर्स बांधले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, मुख्य कॉरिडॉरसाठी 227 कोटी रुपयांची पुनर्बांधणी योजना आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama