वृत्तसंस्था
साणंद : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातच्या साणंद येथे देशातील तिसऱ्या सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन केले. साणंद येथील सीजी सेमीच्या ओएसएटी (OSAT) प्लांटमध्ये आजपासून उत्पादन सुरू झाले आहे.PM Modi
पंतप्रधानांनी सांगितले की, या प्लांटमध्ये दरवर्षी 20 कोटी चिप्स तयार होतील. येथे दरवर्षी 500 कोटी चिप्स बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारत आज जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. आम्ही मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसोबत त्या चिप्स देखील बनवू, ज्यांच्यावर संपूर्ण जग चालते.PM Modi
ते म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी मी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी संपूर्ण नियोजन केले होते. त्यावेळचे केंद्र सरकार मोठी विधाने करत होते, त्यामुळे अनेक कंपन्या आल्याही, पण त्यावेळच्या केंद्र सरकारला काय झाले माहीत नाही, त्यांच्या पायात बेड्या पडल्या आणि गोष्ट पुढे सरकली नाही.
5 महिन्यांत तीन प्लांट सुरू
वैष्णव म्हणाले की, सेमीकंडक्टर क्षेत्रात काम वेगाने पुढे जात आहे. त्यांनी सांगितले की, पहिला प्लांट 28 फेब्रुवारीला, दुसरा 31 मार्चला आणि तिसरा प्लांट 4 जुलैला सुरू होत आहे. इतक्या कमी वेळात तीन मोठे प्लांट सुरू होणे ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प 80% पूर्ण
अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती देताना सांगितले की, हा प्रकल्प सुमारे 80 टक्के पूर्ण झाला आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा दरम्यान 2027 मध्ये सुरू केला जाईल. त्यानंतर वापी-सुरत, वापी-अहमदाबाद, अहमदाबाद-ठाणे आणि अहमदाबाद ते मुंबईपर्यंत सेवा सुरू केली जाईल.
केंद्र सरकारचा दावा आहे की, सेमीकंडक्टर उत्पादन आणि बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प भारताला आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरतील.

