बीड | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची आज बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पाहणी केली. गेवराई तालुक्यातील उमापूर परिसरात पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, आणि झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत, असं मुंडेंनी सांगितलं.
अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्यासह शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या, असं प्रीतम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
/div>

