Dailyhunt
राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती करणार उपोषण!

राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती करणार उपोषण!

नवी दिल्ली | राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याप्रकरणी उपसभापती हरिवंश यांनी एक दिवसीय उपोषणाचा निर्णय घेतला आहे. उपोषणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात हरिवंश म्हणाले, राज्यसभेत जे काही झालं त्यामुळे मी अतिशय मानसिक तणावात आहे. रात्रभर झोपूही शकलो नाही. उच्च सभागृहात जे काही घडलं, त्यामुळे सभागृहाच्या मर्यादेचं मोठं नुकसान झालंय.

'सभागृहात सदस्यांकडून लोकशाहीच्या नावाखाली हिंसक कृत्य झालं. उच्च सभागृहाची मर्यादा आणि व्यवस्थेचे उल्लंघन करण्यात आलं.' असंही ते म्हणालेत.

निलंबित खासदारांसाठी चहा घेऊन जाणाऱ्या उपसभापतींचं नरेंद्र मोदींकडून कौतुक, म्हणाले...

'तो' प्रश्न तुम्ही शिवसेनेलाच विचारा- अशोक चव्हाण

.अन् उपसभापतींनीच संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी आणला चहा!

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat