मुंबई | सर्वजनिक जीवनात संवादाची भाषा हिंदी आणि इंग्रजी झाल्याचं दिसून येत आहे. मात्र सोशल मीडियावर व्यक्त होताना लोक मराठी भाषेचा वापर करत आहे. युनिकोड तंत्रज्ञानामुळे मोबाईलवर देवनागरी लिपी लिहिणं सोपं झालंय.
आपण बोलेल ते उमटत असल्याने मराठी भाषेचा वापर वाढला आहे. गेल्या काही वर्षात मराठी वापराचं प्रमाण 800 ते हजार टक्क्यांनी वाढलं आहे.
भारतात 50 कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात. त्यात अँड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्या लोकांच्या भाषेसंदर्भात विश्लेषण करण्यात आलं. त्यात 75 टक्के लोक मातृभाषेतून माहिती शोधत असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, केपीएमजी आणि गुगल या सल्लागार कंपन्यांनी केलेल्या पाहणीत 2021 अखेरपर्यंत भारतातील 20 कोटींहून अधिक लोक इंटरनेट हिंदीतून वापर करतील, तर मराठीतून वापर करणाऱ्यांची संख्या 5 कोटींचा टप्पा ओलांडेल.

