महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय आक्रमक, रोखठोक आणि तितकेच वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे नितेश नारायण राणे. आपल्या धारदार वक्तव्यांनी आणि 'राणे शैली'तील आंदोलनांनी ते नेहमीच चर्चेत असतात.
पण याच आक्रमकतेमुळे ते आता एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकले आहेत. २०१९ मधील कणकवलीतील गाजलेल्या 'चिखलफेक' प्रकरणाचा निकाल लागला असून, राज्याचे विद्यमान मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीने कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे की आक्रमकता दाखवावी, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या दिवशी नक्की काय घडलं होतं आणि न्यायालयाने नितेश राणे यांच्यावर नेमके काय ताशेरे ओढले आहेत.

