अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान, आमिर खानने खुलासा केला की चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार आहे. आमिर म्हणाला, "राजू (राजकुमार हिरानी) सध्या '3 इडियट्स 2' च्या कथेवर काम करत आहे. मी मूळ कथा ऐकली आहे आणि ती खरोखरच अप्रतिम आहे. पटकथेवर थोडे काम बाकी असले तरी, कथेची संकल्पना खरोखरच अद्वितीय आहे."
आमिरने पुढे सांगितले की, तो पुन्हा एकदा फुन्सुख वांगडूची भूमिका साकारण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. त्याचा आधीचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' अयशस्वी झाल्यानंतर, आमिर आता 'सितार जमीन पर' आणि '3 इडियट्स' सारख्या प्रोजेक्ट्सद्वारे पुन्हा एकदा यशाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच आली समोर; पती रणवीर सिंग घेत होता काळजी
जर बातम्यांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, '3 इडियट्स 2' ची कथा पहिल्या चित्रपटाच्या शेवटच्या भागापासून पुढे सुरू होणार नाही. या चित्रपटात दहा वर्षांचा लीप असेल. १० वर्षांनंतर तीन कॉलेज मित्र - रांचो, फरहान आणि राजू - त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात कुठे उभे आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल.
असे म्हटले जाते की, आर. माधवन (फरहान) आणि शर्मन जोशी (राजू) हे चित्रपटात आमिर खानसोबत परत येण्याची जवळपास खात्री आहे. करीना कपूर खान देखील 'प्रियाची भूमिका पुन्हा साकारू शकते. बोमन इराणी (व्हायरस) आणि ओमी वैद्य (चतुर) यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण मानला जातो, त्यामुळे निर्माते त्यांना पटकथेत एक महत्त्वाची भूमिका देण्याचा विचार करत आहे.
चंद्रकांता' फेम अभिनेते भरत कपूर यांचे निधन
Edited By- Dhanashri Naik
प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन

