अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक हत्ती एकटा होता तो एका चांगल्या मित्राच्या शोधात जंगलात फिरत होता. हत्तीला एका माकडाची भेट झाली आणि त्याने त्याला मैत्रीचा प्रस्ताव दिला. माकडाने मैत्रीचा प्रस्ताव नाकारला कारण हत्ती त्याच्यासारखा झाडांवर डोलू शकत नव्हता.
नंतर, त्याच दिवशी, हत्तीने सर्व प्राणी घाबरून पळून जाताना पाहिले. हत्तीने अस्वलाला थांबवले आणि इतक्या घाईचे कारण विचारले. अस्वलाने सांगितले की एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. हत्तीने नम्रपणे वाघाला सर्व प्राण्यांवर हल्ला करणे थांबवण्याची विनंती केली, परंतु वाघाने त्याचे ऐकले नाही. दुसरा कोणताही मार्ग न सापडल्याने हत्तीने वाघावर हल्ला केला आणि त्याला हाकलून लावले. सर्व प्राणी हत्तीचे आभार मानत होते आणि म्हणाले की तो त्यांचा मित्र होण्यासाठी अगदी योग्य आहे. तेव्हा पासून सर्वजण आनंदात राहू लागले.
तात्पर्य : जिवलग मैत्री ही कोणाशीही करता येते.

