Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत, लाभ घेणाऱ्या  पुरुषांकडून होणार वसुली

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत, लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून होणार वसुली

पात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांकडून आतापर्यंत देण्यात आलेली आर्थिक मदत परत घेतली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.मात्र, महिलांच्या नावाने अर्ज करून योजनेचा लाभ घेणाऱ्या 14 हजार पुरुषांकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत हप्ते का थांबले? मंत्री अदिती तटकरे यांनी चार प्रमुख कारणे सांगितली

लाभार्थ्यांच्या पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी समोर आले. या पार्श्वभूमीवर अपात्र महिलांकडून रक्कम वसूल केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महिलांना एकवेळची माफी देण्यात येणार असून त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत.

डेटाबेसच्या आधारे करण्यात आलेल्या या योजनेत पडताळणीत महिलांच्या नावाने अर्ज करून 14 हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतल्यामुळे या सर्वांकडून मिळालेली रक्कम परत वसूल करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजने'तून ८० लाख महिला वगळल्या, मुख्यमंत्री म्हणाले-अपात्र महिलांना हटवले

सार्वजनिक निधीचा वापर नियमानुसार होणे आवश्यक असल्याने ही कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लाभार्थ्यांच्या छाननीदरम्यान अनेक अपात्र अर्ज समोर आले. त्यामध्ये:

14 हजार पुरुषांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला. (Ladki Bahin Yojana)

सुमारे 5 लाख सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले.

10 लाख प्राप्तीकर भरणाऱ्या महिलांचा लाभार्थ्यांमध्ये समावेश होता.

जवळपास 5 लाख महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने असल्याचे आढळले.

अनेक लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती.

या सर्व कारणांमुळे संबंधित लाभार्थ्यांचे मानधन थांबविण्यात आले आहे.

80 लाख महिला अपात्र बाबत अदिती तटकरे यांचे विरोधकांना उत्तर, स्पष्टीकरण दिले

पुन्हा ई-केवायसीसाठी सरकार तयार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अनेक महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक किंवा माहितीविषयक चुका झाल्या आहेत. अशा लाभार्थ्यांना संधी देण्यासाठी आवश्यक असल्यास पुन्हा ई-केवायसी विंडो सुरू करण्यात येईल.

सुमारे 25 लाख महिलांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांना दुरुस्तीची संधीही देण्यात आली आहे.

आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण देखील आले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की तांत्रिक समस्या आणि ई-केवायसीच्या अभावामुळे हप्ते थांबले आहे आणि अर्ज नाकारण्यात आलेले नाहीत.

अदिती तटकरे यांनी सांगितले की, सुमारे ८० लाख अर्जदारांचा आकडा हा पूर्णपणे अर्ज नाकारल्याचा परिणाम नाही. यापैकी अनेक महिलांनी विहित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सरकारने या प्रक्रियेसाठी अंदाजे ८-१० महिन्यांचा मोठा कालावधी दिला होता. शिवाय, डेटा पडताळणी दरम्यान इतर काही विसंगती देखील आढळून आल्या.

Edited By - Priya Dixit

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi