Dailyhunt
महाभारताच्या कथा: दानवीर कर्ण

महाभारताच्या कथा: दानवीर कर्ण

Kids story : महाभारताच्या कथेत अनेक महान पात्रांचा उल्लेख आहे. तसेच त्यांपैकी एक होते कर्ण, जे उदार होते. श्रीकृष्ण नेहमी कर्णाच्या उदारतेची प्रशंसा करायचे. अर्जुन आणि युधिष्ठिर देखील दान आणि सत्कर्म करायचे, परंतु श्रीकृष्ण कधीही त्यांची प्रशंसा करत नव्हते.
एके दिवशी अर्जुनाने श्रीकृष्णांना याचे कारण विचारले. श्रीकृष्ण म्हणाले, "वेळ येईल तेव्हा सिद्ध करेल की सर्वात मोठा दाता सूर्यपुत्र कर्ण आहे."

तसेच काही दिवसांनी एक ब्राह्मण अर्जुनाच्या महालात आले. त्यांनी सांगितले की, माझी पत्नी वारली आहे. व तिच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना चंदनाच्या लाकडांची आवश्यकता आहे. ब्राह्मणाने अर्जुनकडे दान म्हणून चंदन मागितले. तेव्हा अर्जुनने आपल्या मंत्र्याला चंदनाची व्यवस्था करण्याचा आदेश दिला, परंतु त्या दिवशी संपूर्ण राज्यात चंदन सापडले नाही. अर्जुन ब्राह्मणाला म्हणाला, "मला माफ करा, मी तुमच्यासाठी चंदनाची व्यवस्था करू शकलो नाही." श्रीकृष्ण हे पाहत होते. ते ब्राह्मणाला म्हणाला, "तुम्हाला एका ठिकाणी नक्कीच चंदन सापडेल, माझ्यासोबत चला." श्रीकृष्ण अर्जुनालाही सोबत घेऊन गेले. श्रीकृष्ण आणि अर्जुन ब्राह्मणांचा वेष धारण करून त्या ब्राह्मणासोबत कर्णाच्या दरबारात पोहोचले. तिथेही ब्राह्मणाने कर्णाकडे दान म्हणून चंदन मागितले. कर्णाने आपल्या मंत्र्याला चंदनाची व्यवस्था करण्यास सांगितले. काही काळानंतर, कर्णाच्या मंत्र्याने सांगितले की संपूर्ण राज्यात कुठेही चंदन सापडत नाही. यावर कर्णाने आपल्या मंत्र्याला आदेश दिला की त्याच्या महालात चंदनाचे खांब आहे, ते तोडून ब्राह्मणाला दान करावे. मंत्र्यांनीही तेच केले. ब्राह्मण चंदन घेऊन आपल्या पत्नीला दहन करायला गेला. श्रीकृष्ण अर्जुनला म्हणाले, "हे बघ, तुझ्या महालाचे खांबही चंदनाचे बनलेले आहे, पण तू ब्राह्मणाला निराश केलेस. तिथे, कर्णाने पुन्हा एकदा त्याची उदारता दाखवली." अश्याप्रकारे अर्जुनाला कर्णाची उदारता समजली.

तात्पर्य- दान ही समृद्ध परिस्थितीत केली जाणारी गोष्ट नाही, तर खरी दान ती आहे जी गरिबीतही करता येते.

Edited By- Dhanashri Naik
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi