Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील आणि भारतातील काही 'हॉन्टेड' ठिकाणांबद्दल नेहमीच चर्चा रंगलेली असते. जर तुम्हाला अशा गूढ ठिकाणांबद्दल जाणून घ्यायचे असेल आज आपण मुंबईतील एका ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत.
मुकेश मिल्स ही मुंबईतील सर्वात 'हॉन्टेड' ठिकाणांपैकी एक मानली जाते. ही मिल १८७० च्या दशकात सुरू झाली होती, पण १९८० मध्ये लागलेल्या एका भीषण आगीनंतर ती बंद पडली. तेव्हापासून ही इमारत ओसाड आहे. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण असले तरी, अनेक कलाकार आणि क्रू मेंबर्सनी येथे भीतीदायक अनुभव आल्याचे सांगितले आहे. ओसाड पडलेल्या भिंती, तुटलेली छपरे आणि तिथली शांतता यामुळे हे ठिकाण खूपच गूढ वाटते.
Haunted places In India आजही लोक तिथे जाण्यास घाबरतात; जिथे सूर्यास्तानंतर थांबण्यास परवानगी नाही
मुकेश मिल्स ही मुंबईतील कुलाबा भागातील समुद्रकिनारी असलेली एक जुनी, आता भग्नावस्थेत असलेली कापड गिरणी आहे. हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध 'हॉन्टेड' ठिकाणांपैकी एक मानले जाते, पण बॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीही हे एक लोकप्रिय ठिकाण राहिले आहे.इतिहास-
१८७० च्या दशकात बांधलेली तसेच काही स्रोतांनुसार १८५० ते १९०० च्या दरम्यान ही दक्षिण मुंबईतील एकमेव गिरणी होती आणि समुद्राच्या जवळ असल्यामुळे कापूस व कापड व्यापारासाठी सोयीस्कर होती.
साधारण १९८२ मध्ये, येथे भीषण आग लागली, ज्यात अनेक गिरणी कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर गिरणी बंद झाली. तसेच असे सांगण्यात येते की, शॉर्ट सर्किट किंवा अज्ञात कारणामुळे ही आग लागली. सुमारे २००० साली गिरणी पूर्णपणे बंद झाली. ही ब्रिटिशकालीन सर्वात जुन्या गिरण्यांपैकी एक होती जी नंतर बंद झाली.
मुकेश मिल्स प्रसिद्ध का आहे?
'ओम शांती ओम', 'भूत' आणि इतर अनेक चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि फॅशन शूटसाठी मुकेश मिल्सचा वापर केला गेला. त्याच्या पडक्या कमानीच्या खिडक्या, समुद्राचे दृश्य आणि जुन्या भिंतींमुळे एक सिनेमॅटिक अनुभव येतो. सूर्यास्तानंतर सहसा चित्रीकरण टाळले जाते.
कमी बजेटमध्ये 2 दिवसांची ट्रिप कुठे प्लॅन कराल?
तसेच आगीत ठार झालेल्या कामगारांचे आत्मे मुकेश मिल्स इथे आजून आहे अश्या अफवा सामान्य आहे. लोकांना विचित्र आवाज, पावलांचे आवाज, सावल्या आणि विचित्र घटना ऐकू येतात. स्थानिक लोक रात्री किंवा एकटे भेट देण्यास घाबरतात. अनेक भयकथा यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्या आहे.२०१९ मध्ये, बीएमसीने इमारतीच्या संरचनात्मक कमकुवतपणामुळे ते बंद केले. आता चित्रीकरणास मनाई आहे. समुद्राच्या जवळ असल्यामुळे हे ठिकाण सुंदर आहे, परंतु ते धोकादायक देखील आहे.
ही गिरणी तिच्या पडक्या इमारती आणि गूढ वातावरणामुळे चित्रपट चित्रीकरणासाठी खूप प्रसिद्ध आहे, पण तितकीच ती तिथल्या कथित 'हॉन्टेड' कथांमुळेही चर्चेत असते.
मुंबई-पुण्याजवळच्या 'या' ५ जागा, जिथे तुम्ही एका दिवसात पिकनिक करून परत येऊ शकता

