हॉकी जर्सीचे 'भगवीकरण': माजी कर्णधाराची रंगाबाबत नाराजी, वादाला तोंड फुटले
भारताचे तिन्ही भालाफेकपटू पात्रता फेरीतील आव्हान यशस्वीपणे पार करण्यात यशस्वी झाले आहेत. रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही दमदार कामगिरी करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमही पुढच्या फेरीत पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे, पात्रता फेरीत नीरजने अर्शद नदीमपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकण्यात यश मिळवले होते.
ग्लासगो येथे झालेल्या पात्रता फेरीत, नीरज चोप्राने भालाफेकीत ७९.६१ मीटरचा सर्वोत्तम प्रयत्न केला. तो ८४.०० मीटरच्या स्वयंचलित पात्रतेच्या गुणापर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु दोन्ही पात्रता गटांच्या एकूण कामगिरीच्या आधारावर, तो पाचव्या स्थानी राहिला आणि १२ जणांच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
Who is Dilip Gavit झाडावरून पडून एक हात गमावला, आता CWG सुवर्णपदक जिंकले, दिलीप गावित यांचा प्रवास
या स्पर्धेत हवामानामुळे खेळाडूंसमोर मोठे आव्हान उभे राहिले. ग्लासगोमधील थंड आणि ढगाळ हवामानामुळे, कोणताही खेळाडू ८४ मीटरचा स्वयंचलित पात्रतेचा गुण गाठू शकला नाही. त्यामुळे, दोन्ही गटांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड करण्यात आली.भारताचे तिन्ही खेळाडू अंतिम फेरीत पोहोचल्याने भारताला सर्वात मोठा आनंद झाला आहे. रोहित यादवने ७८.३७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह नवव्या स्थानावर, तर यशवीर सिंगने ७८.३६ मीटरच्या कामगिरीसह दहाव्या स्थानावर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे भारताला पदकाचे तीन प्रबळ दावेदार मिळाले आहेत.
भालाफेकीत नीरजला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानचा अर्शद नदीम सज्ज
पात्रता फेरीत, श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिराजेने ८२.८४ मीटर थ्रो करून प्रथम क्रमांक पटकावला. दरम्यान, पाकिस्तानच्या अर्शद नदीमला त्याच्या पहिल्या प्रयत्नानंतर अंतरात सुधारणा करता आली नाही, परंतु ७८.६३ मीटर थ्रो करून सातव्या स्थानी राहून त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता सर्वांचे लक्ष अंतिम फेरीवर असेल, जिथे नीरज चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या मंचावर सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय ठेवेल. तीन भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचल्याने देशाच्या पदकाच्या आशाही लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.
Edited By - Priya Dixit

