नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी नुकताच एक सामंजस्य करार झाल्यानंतर भारताकडे येणाऱ्या ११ जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास केला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतीय ध्वज असलेली १० जहाजे पर्शियन आखात क्षेत्रात आहेत, तर अलीकडेच दोन जहाजे तेथे पोहोचली आहेत. १७ जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आतापर्यंत भारताकडे येणाऱ्या ११ जहाजांनी या संवेदनशील मार्गावरून यशस्वीरीत्या प्रवास केला आहे.
इस्रायलची लेबनॉनमध्ये कारवाई; अमेरिका-इराण चर्चा तूर्त रखडलीजहाजांचा तपशील मालाची वाहतूक
भारतीय ध्वजांकित क्रूड ऑईल टँकर्स: ३ जहाजे (प्रत्येकी २८५,००० मेट्रिक टनांहून अधिक कच्चे तेल), परदेशी ध्वजांकित एलपीजी वाहक: १ जहाज., परदेशी ध्वजांकित क्रूड ऑईल टँकर: १ जहाज, परदेशी ध्वजांकित बल्क कॅरिअर्स: ६ जहाजे (खतांची वाहतूक). परराष्ट्र मंत्रालयाने आशा व्यक्त केली आहे की, पर्शियन आखातात असलेली उर्वरित भारतीय जहाजे देखील लवकरच सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करतील.

