Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
२४६ कोटींची दहिसर नदी पुनरुज्जीवन योजना अंतिम टप्प्यात

२४६ कोटींची दहिसर नदी पुनरुज्जीवन योजना अंतिम टप्प्यात

NEWS डंका 1 month ago

उत्तर मुंबईला मोठा दिलासा

त्तर मुंबईत पर्यावरण आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी मोठे पाऊल उचलत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांतून ₹२४६ कोटींचा दहिसर नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

मे २०२४ मध्ये लोकसभा खासदार झाल्यानंतर गोयल यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण आढावा बैठकीमुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सांडपाणी रोखणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे आणि नदी स्वच्छ व निरोगी बनवणे हा आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यात आले आहेत.

इंदिरा नगर येथे 5.0 MLD आणि सुकुरवाडी येथे 1.5 MLD क्षमतेचे दोन आधुनिक, स्वयंचलित STP प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हे प्रकल्प प्रगत मेम्ब्रेन बायोरिएक्टर (MBR) तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सध्या त्यांचे कमिशनिंग आणि हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेले पाणी बागकाम, रस्ते स्वच्छता आणि इतर अपेय (नॉन-पोटेबल) वापरांसाठी वापरले जाणार असून त्यामुळे जलसंधारणाला चालना मिळणार आहे.

सुमारे १२ किलोमीटर लांबीची दहिसर नदी तुलसी तलावापासून मनोर खाडीपर्यंत पसरलेली असून, अनेक वर्षे घाण आणि अनियंत्रित सांडपाण्यामुळे ती प्रदूषित झाली होती. २६ जुलै २००५ च्या मुंबई पुरानंतर चितळे समितीने या नदीच्या पुनरुज्जीवनाची शिफारस केली होती. या प्रकल्पांतर्गत ४.७५ किलोमीटर नदीपट्ट्याचे सुधारणा काम, ४.४ किलोमीटर लांबीची सिव्हर लाईन, इंटरसेप्टर प्रणालीद्वारे सांडपाण्याचे वळवणे, तसेच सर्व्हिस रोड आणि रस्त्याकडेला ड्रेनेज सिस्टम उभारणे यांचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे केवळ नदीची स्थिती सुधारेल असे नाही, तर पूरस्थितीतही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शहबाज शरीफ यांच्या 'मसुदा' पोस्टवरून पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अमेरिका- इराण युद्धाचा जागतिक GDP ला ५४.८८ लाख कोटींचा फटका

बनावट एआय व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

सीझफायरवर सहमती, पण लेबनॉनचा समावेश नाही

प्रकल्पाच्या प्रगतीसाठी बहुविभागीय आढावा यंत्रणा तयार करण्यात आली असून विविध विभागांचे अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. लोककल्याण कार्यालयामार्फत नियमित देखरेखीमुळे कामाला वेग आला आहे. यावेळी पीयूष गोयल म्हणाले, 'पूरस्थिती टाळणे आणि उत्तर मुंबईतील नागरिकांच्या अडचणी कमी करणे ही आमची प्राथमिकता आहे.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka