Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्रेयस अय्यरच्या नावावर आयपीएलमध्ये नकोसा विक्रम

श्रेयस अय्यरच्या नावावर आयपीएलमध्ये नकोसा विक्रम

यपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सची घसरगुंडी कायम असून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्यांना ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. हा पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव ठरला. मात्र या पराभवासोबतच कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला.

आयपीएल इतिहासात २०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य बचाव करताना सर्वाधिक सामने गमावणारा कर्णधार म्हणून आता श्रेयस अय्यरचं नाव पुढे आलं आहे. २००+ धावांचं लक्ष्य बचाव करताना अय्यरला तब्बल ७ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलमध्ये याआधी कोणत्याही कर्णधाराने २०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य बचाव करताना ५ पेक्षा अधिक सामने गमावले नव्हते.

विशेष म्हणजे, श्रेयस अय्यरने आतापर्यंत अशा २० सामन्यांत कर्णधारपद भूषवलं आहे ज्यात त्याच्या संघाने २०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यापैकी १२ सामन्यांत विजय मिळाला, तर ७ वेळा पराभवाचा धक्का बसला.

पंजाब किंग्ससाठी हा आणखी एक धक्कादायक आकडा म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य बचाव करताना त्यांचा हा तब्बल १०वा पराभव ठरला आहे.

२०२२ पासून कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध एकही सामना गमावला नव्हता. पण गुरुवारी धर्मशाळेत त्याची ही विजयी मालिका अखेर संपुष्टात आली. मुंबईविरुद्ध कर्णधार म्हणून अय्यरने याआधी सलग ७ विजय मिळवले होते.

एका संघाविरुद्ध सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम मात्र गौतम गंभीरच्या नावावर कायम आहे. गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना पंजाब किंग्सविरुद्ध सलग ८ सामने जिंकले होते.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० षटकांत ८ विकेट्स गमावत २०० धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने आक्रमक फलंदाजी करत ३२ चेंडूत ५७ धावांची शानदार खेळी केली. तर अजमतुल्लाह उमरजईने फक्त १७ चेंडूत ३८ धावा फटकावत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

हेही वाचा :

डॉलरऐवजी आता युआनमध्ये कर्ज; पाकिस्तानने पहिल्यांदाच जारी केला 'पांडा बॉन्ड'

४० लाखांचे पॅकेज देऊनही ऑरॅकलची माघार

जालंधर बीएसएफ मुख्यालय स्फोट प्रकरणी टॅक्सी चालकाला अटक

वाकलेले ट्रम्प तैवानला विकतील का?

मात्र मुंबई इंडियन्सने हे आव्हान १९.५ षटकांत ४ विकेट्स गमावत पूर्ण केलं. तिलक वर्माने जबरदस्त फलंदाजी करत ३३ चेंडूत ७५ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

रयान रिकेल्टनने २३ चेंडूत ४८ धावा करत तिलकला चांगली साथ दिली. शेवटी विल जॅक्सने अवघ्या १० चेंडूत नाबाद २५ धावा करत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka