Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सीझफायरनंतरही इराणमधील नागरिकांना भारताचा तात्काळ देश सोडण्याचा सल्ला

सीझफायरनंतरही इराणमधील नागरिकांना भारताचा तात्काळ देश सोडण्याचा सल्ला

NEWS डंका 1 month ago

नागरिकांसाठी नवी अ‍ॅडव्हायजरी जारी

ध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम (सीझफायर) जाहीर झाल्यानंतरही भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांसाठी नवी अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना 'Expeditiously exit' म्हणजेच शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे.

अ‍ॅडव्हायजरीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतीय नागरिकांनी ठरवलेल्या मार्गांचाच वापर करावा आणि दूतावासाशी संपर्क न साधता कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने जाऊ नये. तसेच नागरिकांनी दूतावासाशी सतत संपर्कात राहून प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वी परिस्थिती गंभीर झाल्यावर भारतीयांना ४८ तास घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, सीझफायरनंतरही भारताने सावध भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

दूतावासाने मदतीसाठी (+989128109115, +989128109109, +989128109102, +989932179359) हे आपत्कालीन क्रमांकही जाहीर केले आहेत, जेणेकरून गरज भासल्यास त्वरित मदत मिळू शकेल. अधिकृत आकडेवारीनुसार, संघर्ष सुरू होताना सुमारे ९,००० भारतीय इराणमध्ये होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश होता. आतापर्यंत जवळपास १,८०० नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले असून उर्वरित लोकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शहबाज शरीफ यांच्या 'मसुदा' पोस्टवरून पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अमेरिका- इराण युद्धाचा जागतिक GDP ला ५४.८८ लाख कोटींचा फटका

बनावट एआय व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

सीझफायरवर सहमती, पण लेबनॉनचा समावेश नाही

अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या सीझफायरवर सहमती झाली आहे. मात्र, हा फक्त तात्पुरता दिलासा मानला जात असून परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि सर्व नागरिकांनी कोणतीही बेपर्वाई न करता अधिकृत सूचनांचे पालन करावे. एकूणच, सीझफायरमुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी भारत सरकार कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसून नागरिकांची सुरक्षित परतफेड सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka