Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
NEET-UG परीक्षा गैरव्यवहार प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

NEET-UG परीक्षा गैरव्यवहार प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

NEET-UG परीक्षा गैरव्यवहार प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नवी दिल्ली:
NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट लिहून याबाबतची अधिकृत माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह देशभरात विद्यार्थी, पालक आणि संघटनांकडून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात होती. वाढता राजकीय व सामाजिक दबाव लक्षात घेता प्रधान यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले?
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात नमूद केले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडू नये आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा कोणताही असामाजिक घटक घेऊ नये, यासाठी मी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच ३ मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर सरकारने तत्काळ दखल घेऊन तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द करून पुनर्रचनेची घोषणा केली. आगामी वर्षांपासून ही परीक्षा संगणक आधारित (CBT - Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या चार दशकांपासून मी शिक्षण क्षेत्राशी जोडला गेलो आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे आणि देशात शांतता टिकवणे ही माझी प्राथमिकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलन आणि पार्श्वभूमी:
NEET परीक्षा रद्द करणे आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या अनेक दिवसांपासून हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. केंद्र सरकारने परीक्षा गैरव्यवहारांवर आळा घालण्यासाठी कठोर कायद्याचे विधेयक संसदेत आणण्याची तयारी दर्शवली आहे, तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (NTA) व्यापक सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळातून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या वादाला नवे वळण मिळाले असून, आता नवीन शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती कोणाची होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Rashtramat