Dailyhunt
मुंबईच्या जलवाहतुकीत क्रांती! 15 'फ्लाईंग बोटीं'ची ऑर्डर

मुंबईच्या जलवाहतुकीत क्रांती! 15 'फ्लाईंग बोटीं'ची ऑर्डर

Mumbai Flying Boat

मुंबई (Mumbai): मुंबईकरांसाठी एक अत्यंत रोमांचक बातमी आहे. गेट वे ऑफ इंडियावरून अलिबाग किंवा एलिफंटाला जाण्यासाठी आतापर्यंत तुम्ही ज्या पारंपारिक बोटीतून प्रवास केला आहे, तो अनुभव लवकरच पूर्णपणे बदलणार आहे.

कारण, महाराष्ट्राच्या सागरी इतिहासात एक नवीन आणि 'स्मार्ट' अध्याय जोडला जात आहे आणि हा अध्याय आहे 15 इलेक्ट्रिक 'फ्लाईंग बोटीं'चा!

Pune: RTO चौकातील वाहतूक कोंडी कायमस्वरुपी सोडविण्यासाठी काय आहे महापालिकेचा प्लॅन?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई' या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनातून प्रेरित होऊन, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकताच स्वीडन दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कॅन्डेला (Candela) या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि त्यांच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित बोटींची सविस्तर पाहणी केली.

या बोटींची खास बाब म्हणजे त्यांची रचना आणि तंत्रज्ञान. मेरिटाईम बोर्डाकडून ज्या 15 इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे, त्या सामान्य नाहीत, तर त्या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे 'फ्लाईंग बोट' म्हणून ओळखल्या जातात.

पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 'या' 3 जिल्ह्यांसाठी गुड न्यूज! सरकारने काय घेतला निर्णय?

या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ठराविक वेगावर पोहोचल्यावर बोटीच्या खाली असलेले दोन लांब फॉईल्स बोटीच्या मुख्य भागाला पाण्यावर उचलतात. यामुळे बोट एकप्रकारे पाण्यावर 'ग्लाईड' (glide) करते किंवा 'फ्लाईंग' करू लागते.

  • यामुळे बोटीच्या प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.

  • बोटीचा मुख्य भाग पाण्यावर उचलला गेल्यामुळे लाटांचे धक्के प्रवाशांना जाणवणार नाहीत.

  • या बोटी पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याने, त्यांचा आवाजही होणार नाही.

  • या बोटी वेगवान, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम आहेत.

Devendra Fadnavis: मुंबईतील पायाभूत प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची डेडलाईन

- मंत्री नितेश राणे यांनी बाल्टिक समुद्रावर Candela च्या C8 आणि P12 या बोटींची सफर केली आणि त्यांचा अनुभव घेतला. आता याच अत्याधुनिक बोटींपैकी P12 ही बोट लवकरच मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल होणार आहे.

- या 15 बोटींमुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

- मंत्री नितेश राणे यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'जागतिक मुंबई'च्या स्वप्नपूर्तीतील महत्त्वाचे पाऊल ठरेल.

- मुंबईत Candela ची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारी भागांतील जोडणी अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.

- या भेटीदरम्यान महाराष्ट्रात Candela चे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा झाली आहे. याचा अर्थ, केवळ बोटीच नाही तर भविष्यात महाराष्ट्रात या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उत्पादन सुरू होऊन, नवीन रोजगार निर्मितीच्या संधी देखील उपलब्ध होतील.

- मुंबईकरांसाठी आता गेट वे ऑफ इंडियावरून अलिबागची सफर एखाद्या 'फ्लाईंग' अनुभवासारखी होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama