मुंबई | हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेते परेश रावल यांनी सर्वांना खळखळून हसवले होते. परेश रावल यांची हेरा फेरीमधील भूमिका आजही तरूण सोशल मीडियावर अपलोड करत असतात.
फिर हेरा फेरी चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने भूमिका वठवली होती. 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या चित्रपटानंतर तिसरा भाग कधी येणार आहे, हा प्रश्न विचारला जात आहे. त्यावरून आता बाबूरावच्या भूमिकेला कंटाळलो आहे, असं मत परेश रावल यांनी व्यक्त केलं आहे. या फ्रेंचायझीमधून परेश रावल यांनी काढता पाय घेतला आहे.
2000 साली प्रियदर्शन यांनी हेरा फेरी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर फिर हेरा फेरी हा नीरज वोहरा यांनी प्रदर्शित केला होता. हेरा फेरी मध्ये जे काही घडल त्यावेळी आम्ही निरागस होतो. परंतु, त्यानंतर दुसऱ्या भागात खुप हुशारी दाखवत होतो. आता बाबूराव गणपतराव आपटे नको तोच तो पणाचा कंटाळा आला आहे, असंही परेश रावल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सध्या तिसऱ्या हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे. परंतु जेव्हाही असं होत त्यावेळेस एखाद्या पात्राला निरागसतेची आवश्यकता असते. तिथे ती नव्हती, तिेथेच चुक झाली. आता मला या पात्रातुन सुटका हवी आहे, असं परेश रावल यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
गुंतवणूकदारांना मोठा फटका! सेनसेक्समध्ये सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण
'जर गाडीत चहाचा थेंब जरी सांडला तर मी.'; गडकरींची कंत्राटदारांना तंबी
डाॅ. शरद पवार! शरद पवारांना 'डॉक्टरेट ऑफ सायन्स' पदवी बहाल

