महाभारताच्या कथा : कर्ण आणि दुर्योधन यांच्यातील मैत्री
ही कथा त्या काळाची आहे जेव्हा माता कुंतीचा विवाह झाला न्हवता आणि ती फक्त एक राजकुमारी होती. त्याच काळात, ऋषी दुर्वासा राजकुमारी कुंतीच्या वडिलांच्या राजवाड्यात वर्षभर पाहुणे म्हणून राहिले. कुंतीने एक वर्ष त्यांची मनोभावे सेवा केली. राजकुमारीच्या सेवेने ऋषी दुर्वासा प्रसन्न झाले आणि त्यांनी राजकुमारी कुंतीला वरदान दिले की ती कोणत्याही देवाला बोलावू शकते आणि त्यांपासून आपत्य प्राप्तीचे वरदान मागू शकते.
आता एके दिवशी राजकुमारी कुंतीच्या मनात विचार आला की वरदानाची परीक्षा का घेऊ नये. असा विचार करून तिने सूर्यदेवाची प्रार्थना केली आणि त्यांना बोलावले. सूर्यदेवाच्या आगमनामुळे आणि वरदानामुळे राजकुमारी कुंती विवाहपूर्वी गर्भवती राहिली. काही काळानंतर तिने एका बाळाला जन्म दिला, जो सूर्य देवासारखा शक्तिशाली आणि तेजस्वी होता. तसेच जन्मापासूनच बाळाच्या कानात कवचकुंडले होती
कुमारी असताना मुलाला जन्म दिल्यामुळे लज्जेच्या भयाने राजकुमारी कुंतीने बाळाला एका पेटीत बंद केले आणि नदीत सोडले. तसेच ही पेटी एका सारथीला आणि त्याच्या पत्नीला सापडली, ज्यांना मूलबाळ नव्हते. कर्णाच्या रूपात मुलगा झाल्याने दोघेही खूप आनंदी झाले आणि त्याचे संगोपन करू लागले. सूर्याचा हा पुत्र नंतर दानवीर कर्ण म्हणून ओळखला जाऊ लागला आणि काही वर्षांनंतर कुरुक्षेत्राच्या युद्धात तो पाच पांडवांसमोर एक शक्तिशाली योद्धा म्हणून उभा राहिला.
Edited By- Dhanashri Naik

