प्रेरणादायी कथा : आचरण महत्वाचे की ज्ञान?
भरताने श्रीरामाला दशरथाच्या मृत्युची माहितीही दिली. ही माहिती ऐकून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना खूप दुःख झाले. भरतने विनंती केली, "मी अयोध्येच्या लोकांकडून आलो आहे. अयोध्येचे सिंहासन तुमची वाट पाहत आहे. कृपया येऊन त्यावर बसा." रामने उत्तर दिले, "मी फक्त माझ्या पालकांची इच्छा पूर्ण करत आहे." भरताला समजले की श्रीराम अयोध्येला परतणार नाही. तेव्हा ते म्हणाले की जोपर्यंत श्रीराम अयोध्येत येत नाही तोपर्यंत सिंहासनावर ते श्रीराम यांच्या पादुका ठेवून राज्य करतील. श्रीरामांनी भरताला त्यांच्या पादुका दिल्या. भरत अयोध्येत परतले आणि त्यांनी श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या. तसेच श्रीराम बंधु भरत यांनी देखील वस्त्र, आभूषण, अलंकार यांचा त्याग करून साधी वेशभूषा केली व १४ वर्ष योग्य पद्धतीने अयोध्येचा कारभार सांभाळला. भरत यांना श्रीरामप्रती खूप आदर होता.
तात्पर्य: भरत यांचे बंधुप्रेम खूप मोठे होते. प्रत्येकाने सर्वांप्रती आदर ठेवायला हवा.
Edited By- Dhanashri Naik
प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

