Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय 'धुरंधरां'नी ३० हून अधिक दहशतवादी टिपले

भारतीय 'धुरंधरां'नी ३० हून अधिक दहशतवादी टिपले

NEWS डंका 2 weeks ago

लष्करच्या नेत्याची कबुली

पाकिस्तानातील बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना, लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या एका वरिष्ठ नेत्याने गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात ३० हून अधिक दहशतवादी भारतीय एजंट्सकडून मारले गेल्याचा दावा केला आहे.

लष्करचा कार्यकर्ता रिझवान हनीफ याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्याने भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 'अज्ञात बंदूकधारी' (Unknown Gunman Model) पद्धतीचा वापर करून लष्करच्या सदस्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.

हनीफच्या म्हणण्यानुसार, २०२० पासून पाकिस्तानातील लाहोर, कराची, रावळपिंडी, सियालकोट आणि इतर शहरांमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या ३० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप त्याने केला. मात्र, या आरोपांबाबत त्याने कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत.

विशेष म्हणजे, हा व्हिडिओ मे २०२६ मध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचे मानले जात असले, तरी तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये वाढत्या असुरक्षिततेची भावना समोर आल्याचे मानले जात आहे.

गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात अनेक कुख्यात दहशतवादी आणि भारतातील दहशतवादी कारवायांशी संबंधित व्यक्तींची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या झाली आहे. या घटनांनंतर पाकिस्तानने अनेकदा भारतावर आरोप केले आहेत. मात्र, भारताने अशा सर्व आरोपांचे सातत्याने खंडन केले असून, पाकिस्तानकडून करण्यात येणारे आरोप हे 'खोटे आणि भारतविरोधी प्रचार' असल्याची भूमिका यापूर्वीही स्पष्ट केली आहे.

डाबरला मध, तूपासह अनेक उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आदेश

भारतासह ६० देशांवरील शुल्काला अमेरिकेत न्यायालयीन आव्हान

ऊर्जाक्षेत्रात भारताची 'सोलर पॉवर'; अमेरिकेला टाकले मागे

दहशतवादी प्रचारप्रकरणी झारखंडमधून पाच जण ताब्यात

रिझवान हनीफची ही कबुली महत्त्वाची मानली जात आहे, कारण पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या वरिष्ठ स्तरावरून अशा प्रकारचा दावा सार्वजनिकपणे प्रथमच समोर आल्याचे मानले जात आहे. या विधानामुळे भारत-पाकिस्तान संबंध आणि सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हनीफच्या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही आणि भारत सरकारकडून या ताज्या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka