Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जल्लोष, पण वांगचुकचा विसर

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जल्लोष, पण वांगचुकचा विसर

NEWS डंका 1 month ago

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विजयाची घोषणा केली. मात्र, या घोषणेदरम्यान तब्बल २६ दिवस उपोषण करून आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर गती देणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा उल्लेखही न केल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

शनिवारी जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी अभिजीत दिपके यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करत विजयाची घोषणा केली. त्यापूर्वी काही मिनिटे आधीच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. मात्र, आपल्या भाषणात दिपके यांनी सोनम वांगचुक यांचे नाव एकदाही घेतले नाही.

'मला नायक बनवू नका'

आपल्या भाषणात दिपके म्हणाले, 'धर्मेंद्र प्रधान यांनी आज राजीनामा दिला म्हणून मला नायक बनवू नका. ही चूक करू नका. या देशाचे नुकसान झाले कारण आपण सतत एका व्यक्तीला नायक बनवत आलो आहोत.'

ते पुढे म्हणाले, 'हा राजीनामा म्हणजे तुम्ही लोक सरकारसमोर न झुकल्याचा पुरावा आहे. जर जनता घाबरली नाही, तर कोणालाही राजीनामा द्यायला भाग पाडू शकते. हेच लोकशाहीचे सामर्थ्य आहे.'

वांगचुकांचा उल्लेख न केल्याने प्रश्न

दिपके यांच्या भाषणात सोनम वांगचुक यांचा उल्लेख नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, लडाखचे शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे आमरण उपोषण करून या आंदोलनाला मोठी ताकद दिली होती. सध्या वांगचुक यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या आश्वासनांनंतर त्यांनी गुरुवारी रात्री उपोषण सोडले.

उपोषण सोडण्याच्या त्यांच्या निर्णयावर काहींकडून टीकाही झाली होती. त्यानंतर त्यांची पत्नी गीतांजली आंगमो यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत, त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.

आंदोलनाला गती देण्यात वांगचुकांची निर्णायक भूमिका

सीजेपीचे आंदोलन ६ जून रोजी सुरू झाले. अमेरिकेतील बोस्टनहून भारतात परतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलनाची सुरुवात केली. सुरुवातीला सौरव दास, आशुतोष रंका आणि काही मोजके सहकारी यांच्याशिवाय या आंदोलनाशी मोठे नाव जोडले गेले नव्हते. मात्र, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

सुरुवातीच्या काही दिवसांत आंदोलनस्थळी गर्दी अत्यल्प होती. सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून वांगचुक यांनी २८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले.

८वा वेतन आयोग : पगार आणि पेन्शनवाढीच्या चर्चांना वेग

कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन घेतले मागे…

अनाहत सिंह इतिहास रचण्यापासून अवघे एक पाऊल दूर

त्यांच्या उपोषणाला दिवसेंदिवस वाढत असलेला प्रतिसाद आणि त्यांच्या प्रकृतीत झालेली घसरण यामुळे देशभरातून आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले. जंतर-मंतरवरील गर्दीतही मोठी वाढ झाली.

रुग्णालयातूनही आंदोलनाला दिशा

१८ जुलै रोजी प्रशासनाने वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या रुग्णालयातील उपोषणाने आंदोलनाला आणखी बळ मिळाले. देशभरातील लाखो समर्थकांनी आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाइलवर 'I Support Sonam' असे संदेश आणि वांगचुक यांचा तिरंग्यासह फोटो लावून पाठिंबा दर्शविला.

रुग्णालयातूनही वांगचुक सातत्याने आंदोलनकर्त्यांना संदेश देत होते. 20 जुलैच्या 'संसद चलो' मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले होते. सहभाग कमी राहिला तर 'मी भूत बनून परत येईन' असेही त्यांनी विनोदी शैलीत म्हटले होते.

२० जुलैनंतर आंदोलनाचा चेहराच बदलला

२० जुलै रोजी संसदेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला. त्यानंतर दिल्ली पोलिस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या घटनांनंतर हजारो नागरिक जंतर-मंतरवर पोहोचले आणि आंदोलन शिगेला पोहोचले.

२२ जुलै रोजी वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली. त्यावेळी केंद्रीय मंत्री नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी त्यांना आश्वासने दिली होती. त्यानंतर वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही काहीशी मवाळ केली. मात्र, तोपर्यंत आंदोलन एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिले नव्हते. आंदोलनकर्त्यांची एकच प्रमुख मागणी होती - धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

विजयाच्या भाषणात वांगचुकांचा अभाव

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनकर्त्यांनी विजय साजरा केला. मात्र, आंदोलनाला नैतिक बळ देणारे आणि युवकांच्या लढ्याला राष्ट्रीय स्वरूप देणारे सोनम वांगचुक यांचा अभिजीत दिपके यांनी आपल्या विजयाच्या भाषणात उल्लेख न केल्याने त्यावर विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka