लखनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम सुरु होता यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली.
महिला आणि चिमुरड्यांच्या अंगावर पाय ठेवून पुढे जात होती. त्यांना वाचवण्यासाठी तिथे कुणीच आले नाही. चेंगराचेंगरीत सापडलेल्या महिला आणि मुलांनी मदतीसाठी एकच आक्रोश केला होता. पण, कुणी मदतीला पुढे आलं नाही, असे या प्रत्यक्षदर्शी चिमुरडीने सांगितले. मृत आणि जखमींना अक्षरश: टेम्पोमधून रुग्णालयात आणण्यात आले आहे. रुग्णालयामध्ये मुख्य आरोग्य अधिकारी उमेश त्रिपाठी, जिल्हाधिकारी विक्रांत द्विवेदी आणि पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी हजर आहे.

