Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राष्ट्रभक्तीचे आवरण घालून काँग्रेस स्वतःला किती लपवणार?

राष्ट्रभक्तीचे आवरण घालून काँग्रेस स्वतःला किती लपवणार?

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली टीका

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या टीमची घोषणा झाल्यानंतर शनिवारी भाजपा मुख्यालयात पहिली पदाधिकारी बैठक झाली.

पहिल्या पदाधिकारी बैठकीत भारताचा गौरव आणि सन्मान तसेच 'वंदे मातरम्' या महामंत्राच्या सन्मानार्थ पहिला ठराव मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत वंदे मातरमबाबत काही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिली.

ते म्हणाले, हे वर्ष वंदे मातरमच्या १५०व्या वर्धापनदिनाच्या रूपाने साजरे केले जात आहे. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात वंदे मातरमबद्दल सन्मान, भावना आणि भावनिक जोडलेपणा पाहायला मिळत आहे. संबित पात्रा म्हणाले, मी वंदे मातरमला मंत्र म्हणून संबोधले, कारण या मंत्राच्या मुळाशी देश आणि देशभक्ती आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या सर्व सहा कडव्यांचे गायन लाल किल्ल्याच्या परिसरात झाले.'

संबित पात्रा म्हणाले, 'काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला जात असताना वंदे मातरम सुरू झाले. त्यावेळी दोन कडव्यांनंतर सोनिया गांधी 'थांबा-थांबा' असे म्हणताना ऐकू आल्या, जणू काही चुकीचे शब्द बोलले गेले आहेत.'

ते म्हणाले की, १९ ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव १९३७ मध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीने ऑक्टोबर महिन्यात कलकत्ता येथे मंजूर केला होता. त्या ठरावानुसार सहा कडव्यांचे वंदे मातरम मान्य केले जाणार नाही, त्याचे विभाजन केले जाईल आणि छाटछूट करून केवळ दोन कडवी गायली जातील.

निकृष्ट पोषण आहार उघड करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे निलंबन रद्द

सोन्याची रेकॉर्डब्रेक झेप! भाव १.६२ लाखांवर

राजस्थानातील ६११ सरकारी शाळा अजूनही इमारतीविना

संबित पात्रा म्हणाले, 'राष्ट्रभक्तीचे आवरण घेऊन अखेर काँग्रेस स्वतःला किती काळ लपवून ठेवणार? आज काँग्रेसवरून राष्ट्रभक्तीचे आवरण पूर्णपणे दूर झाले आहे आणि त्यामागील तुष्टीकरणाचे राजकारण संपूर्ण देश पाहत आहे. मात्र भारतीय जनता पक्ष असे होऊ देणार नाही.'

त्यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण वंदे मातरम, ज्यामध्ये सर्व सहा कडव्यांचा समावेश आहे, गायले गेले.

भाजपच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, 'सूर्योदयासोबत आम्ही संपूर्ण वंदे मातरम ऐकले, त्याचे कौतुक केले आणि नमन केले. मात्र सूर्यास्त होत असताना १५ ऑगस्ट रोजी, ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सामाजिक माध्यमांवर काँग्रेस कार्यालयाचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये सोनिया गांधी वंदे मातरम दोन कडव्यांनंतर थांबवण्यास सांगताना दिसत आहेत.'

ते म्हणाले की, वंदे मातरमबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबित पात्रा यांनी आरोप केला की, राहुल गांधी यांनी स्वतः बंद खोलीतील बैठकीत काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष असल्याचे म्हटले होते. मात्र याचा अर्थ असा नाही की देशाला अशा प्रकारे विभागले जावे.

संबित पात्रा म्हणाले की, महात्मा गांधी यांनी वंदे मातरम गायले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. हे गीत कधीही हिंदू आणि मुस्लिमांना विभाजित करण्याचे साधन नव्हते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka