Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर.

पाकिस्तानने पकडलेल्या भारतीय जवानाचा केला क्रूरपणे छळ; सतत टॉर्चर.

वी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ अनावधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले. वीस दिवसांनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांची सुटका केली आणि भारताच्या स्वाधीन केले.

पण, वीस दिवसांमध्ये पाकिस्तानने त्यांचे हाल केले आहेत.

बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे पाकिस्तानच्या ताब्यात असताना त्यांच्यासोबत क्रूरपणे वागण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना दात घासण्याची परवानगी नव्हती. त्यांना झोपू दिलं नाही. सतत टॉर्चर केलं. त्यांचा फक्त शारीरिक छळ करण्यात आला नाही तर मानसिक छळही करण्यात आला. त्यांना तीन ठिकाणी नेण्यात आलं. विमानांच्या उडण्याचा आवाज ऐकू यावा म्हणून त्यांना एअरबेसजवळही नेण्यात आले होते. आयबीमध्ये नियुक्त असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही त्यांची चौकशी करण्यात आली. बहुतेक वेळा त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जात असे. एका ठिकाणी त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांना शिवीगाळ करण्यात आली.

पूर्णम कुमार शॉ हे १६ वर्षांपासून बीएसएफमध्ये आहे. त्यांची नुकतीच फिरोजपूर येथे पोस्टिंग झाली होती. पूर्णम कुमार शॉ यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडले. तेव्हापासून त्यांचं कुटुंब खूप चिंतेत होते. ते पूर्णम यांच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पाकिस्तानने आता बीएसएफ जवानाची सुटका केल्यावर ते भारतात परत आले. यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. पूर्णम कुमार यांच्या पत्नी रजनी यांनी “माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. सकाळी मला बीएसएफ मुख्यालयातून फोन आला की पूर्णमजी आले आहेत” असं म्हटलं आहे.

“२२ दिवसांनी जेव्हा मी त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा सुरुवातीला मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण त्यांची दाढी वाढली होती. पूर्णम यांनी सांगितलं की. काळजी करू नका, मी पूर्णपणे ठीक आहे, माझी मेडिकल टेस्ट देखील झाली आहे. मी जेवल्यानंतर ३ वाजता तुम्हाला फोन करेन. जेव्हा ते घरी येतील तेव्हा मी त्यांना त्यांचे आवडते पदार्थ करून खायला देईन. मी खूप आनंदी आहे. आम्ही आशा सोडून दिली होती” असे रजनी यांनी म्हटले आहे.

भारत-पाक बॉर्डर! पाकिस्तानने BSF जवानाला 22 दिवसांनी सोडले…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

Operation Sindoor राबवताना भारतमातेचे ८ जवान हुतात्मा; पाहा नावे…

दरम्यान, जवान चंदू चव्हाण यांनाही पाकिस्तानने पकडले होते. ३ महिने २१ दिवसांनतर त्यांची सुटका झाली होती. पाकिस्तानने केलेल्या छळावर आधारीत पत्रकार संतोष धायबर यांनी ‘जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमधील छळाचे ३ महिने २१ दिवस’ हे पुस्तक लिहीले आहे. संबंधित पुस्तक देशभर गाजले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka