पाटणा (बिहार): एका मामीचे आणि भाचीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मामीने प्रेमापोटी नवऱ्याला सोडून पळून जाऊन भाचीशी लग्न केले आहे. माची-भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
गोपालगंजमध्ये सुमन या मामीने आपल्या शोभा या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडले असून, तिने पळून जात भाचीशी लग्न केले आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण व्हायरल होत आहे. या दोघींमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मामी आणि भाचीने आपल्या नातेवाइकांचे न ऐकता दुर्गा भवानी मंदिरात लग्न केले आहे.

