पाटणा (बिहार): एका मामीचे आणि भाचीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मामीने प्रेमापोटी नवऱ्याला सोडून पळून जाऊन भाचीशी लग्न केले आहे. माची-भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
गोपालगंजमध्ये सुमन या मामीने आपल्या शोभा या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडले असून, तिने पळून जात भाचीशी लग्न केले आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण व्हायरल होत आहे. या दोघींमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मामी आणि भाचीने आपल्या नातेवाइकांचे न ऐकता दुर्गा भवानी मंदिरात लग्न केले आहे.
मंदिरात लग्नादरम्यान सर्व विधी पार पाडले. यावेळी दोघींनी एकमेकींना हार घातला, मंगळसूत्र घातले आणि मग सिंदूर लावून सात फेरे घेऊन सात जन्म सोबत राहण्याचे वचन दिले. लग्नानंतर दोघांनीही एकमेकांसोबत शेवटपर्यंत राहण्याची शपथ घेतली. सुमन म्हणाली की, शोभा खूप सुंदर आहे. तिचे दुसरीकडे लग्न झाले तर मला सोडून जाईल या भीतीपोटी आम्ही मंदिरात लग्न केले. दोघींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लग्नाची माहिती कुटुंबीयांना दिली. व्हिडीओमध्ये दोघींनीही त्यांच्या इच्छेनुसार लग्न करून एकत्र राहणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, गोपालगंजमध्ये मामी आणि भाचीचे लग्न हा चर्चेचा विषय ठरत आहे. सगळीकडे या अनोख्या लग्नाची चर्चा होत आहे. मंदिरात लग्न करत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
The post Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

